1. आयुष्मान भारत योजनेचे महत्त्व : आयुष्मान भारत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण त्यांच्या औषधं आणि उपचारांवर मोठा खर्च होतो.
2. सर्वात महत्त्वाचे कागदपत्र : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्डशिवाय अर्ज करता येणार नाही.
3. नाव नोंदणीची प्रक्रिया : योजनेसाठी अर्ज करण्याआधी नाव नोंदणी करणे गरजेचं आहे. मोबाईल नंबर सक्रीय असावा, कारण ओटीपी नामांकन प्रक्रियेसाठी पाठवला जातो.
4. मोबाईल नंबरची महत्त्वता : आधारकार्डसोबत लिंक्ड असलेला मोबाईल नंबर सक्रीय असावा, जर मोबाईल नंबर बंद असेल तर ओटीपी येणार नाही.
5. आर्थिक लाभ आणि कव्हर : वर्षाला 5 लाख रुपयांचं कव्हर मिळेल. पण पाच लाखांचा लाभ हा घरातील 70 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सदस्यांमध्ये वाटून मिळेल.
6. सर्वसामान्य प्रक्रिया : ज्येष्ठ नागरिकांना PMJAY For 70+ योजनेसाठी https://nha.gov.in/PM-JAY या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी..
8. ई-केव्हायसीची प्रक्रिया लाभार्थी (Beneficiary) किव्हा ऑपरेटर (Operator) पर्याय निवडून फॅमिली आयडी, आधारकार्ड माहिती समाविष्ट करा आणि ई-केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करा.
9. नियमित तपासणी नियमितपणे तपासणी करा आणि आपल्या आरोग्याचा लाभ घ्या. तसेच आधारकार्ड आणि मोबाईल नंबर अद्ययावत ठेवा.