
Pik vima : पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. मात्र, या योजनेत गैरप्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात आल्यामुळे सरकारने या योजनेत काही मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे काही शेतकऱ्यांना नुकसान होत असले, तरीही योजनेंतर्गत गैरप्रकार थांबवण्यासाठी हे आवश्यक आहे. या लेखात आपण या बदलांविषयी, गैरप्रकारांबद्दल व यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेऊ.
फळपीक विम्यासाठी किमान आणि कमाल क्षेत्राची अट | Pik vima
फळपीक विमा योजनेंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांसाठी किमान 10 गुंठे क्षेत्रावर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोकणबाहेरील शेतकऱ्यांसाठी ही अट अधिक कठोर असून, किमान 20 गुंठे क्षेत्रावर फळबाग असावी, असे ठरवण्यात आले आहे.
तसेच, फळपीक विम्यासाठी कमाल क्षेत्राची मर्यादा चार हेक्टर निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, जरी एखाद्या शेतकऱ्याच्या मालकीची फळबाग पाच हेक्टर क्षेत्रावर असेल, तरीही विमा फक्त चार हेक्टरसाठीच काढता येईल.
या बदलांचे उद्दिष्ट:
फळपीक विमा योजनेत गैरप्रकार टाळणे.
दोनचार फळझाडांवर आधारित खोटा विमा काढण्याचे प्रकार रोखणे.
मृग बहार 2024: अर्ज तपासणीतील निष्कर्ष
मृग बहार 2024 हंगामासाठी फळपीक विमा योजनेंतर्गत 63,737 अर्ज प्राप्त झाले होते. तपासणीनंतर, यातील हजारो अर्जांमध्ये खोटी माहिती असल्याचे स्पष्ट झाले.
तपासणी अंती निष्कर्ष:
10,000 अर्जांमध्ये खोटी माहिती आढळली.
3,500 प्रकरणांमध्ये लहान फळबाग मोठी असल्याचे दाखवण्यात आले.
151 प्रकरणांमध्ये कमी वयाच्या फळबागांना मोठ्या वयाच्या फळबागा भासवले.
यामुळे 13,500 हून अधिक अर्ज अपात्र ठरवण्यात आले, तसेच अशा अर्जांवर आधारित भरलेला विमा हप्ता जप्त करण्यात आला.
आंब्या बहार 2023: भरपाई वितरणाचा अंतिम टप्पा
आंब्या बहार 2023 अंतर्गत राज्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला होता.
विमा कंपन्यांनी एकूण 811 कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला, त्यापैकी 164 कोटी शेतकऱ्यांनी थेट भरले.
836 कोटी रुपयांच्या आसपासची भरपाई 1.92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.
85% शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली.
जिल्हानिहाय भरपाई:
जळगाव: 53,261 शेतकऱ्यांना 337 कोटी रुपये.
जालना: 55,254 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये.
सिंधुदुर्ग: 39,122 शेतकऱ्यांना 70.8 कोटी रुपये.
रत्नागिरी: 32,563 शेतकऱ्यांना 79.19 कोटी रुपये.
गैरप्रकार रोखण्यासाठी घेतलेले कठोर उपाय
फळपीक विमा योजनेंतर्गत खोट्या अर्जांवर आधारित नुकसानभरपाई घेण्याचे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने नियम कठोर केले आहेत. उदाहरणार्थ, छोट्या बागा मोठ्या असल्याचे दाखवणे, कमी वयाच्या फळबागांचे वय जास्त असल्याचे सांगणे आणि बनावट फळझाडांच्या नावाखाली भरपाई मिळवणे यांसारख्या प्रकरणांवर आळा घालण्यात आला आहे.
नियम बदलांमुळे शेतकऱ्यांवरील परिणाम
नवीन नियमांमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
लहान शेतकऱ्यांचे नुकसान:
ज्या शेतकऱ्यांची फळबाग 10 किंवा 20 गुंठ्याच्या मर्यादेच्या खाली आहे, त्यांना विम्याचा लाभ मिळणार नाही.
कमाल क्षेत्र मर्यादा:
चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असलेल्या बागांचे नुकसान होईल, कारण त्यांना फक्त चार हेक्टरसाठीच विमा काढता येईल.
शेतकऱ्यांसाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे
1. नियम समजून घ्या:
शेतकऱ्यांनी नवीन नियम व अटी काळजीपूर्वक वाचून फळपीक विमा योजना निवडावी.
2. योग्य माहिती द्या:
अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, कारण अपात्र ठरल्यास नुकसान होऊ शकते.
3. क्षेत्र आणि पीक प्रकार तपासा:
तुमची फळबाग किमान व कमाल क्षेत्राच्या अटींमध्ये बसते की नाही, याची खात्री करा.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

